शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वशैलीवर भाष्य केलं होतं. राहुल गांधी यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याचं मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
“राहुल गांधी आमचे नेते आहेत, त्यांचं नेतृत्व पक्षानं स्विकारलं आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होतो आहे. त्यांनी जिवनात जे दुःख पाहिलं, त्यातूनही सावरत ते नेतृत्व करत आहेत. शरद पवार यांचं ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतू ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं.” असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी आपलं मत मांडलं.
काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकार टिकवायचं असेल तर आघाडीतील नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका-टिपण्णी करणं टाळावं, असा स्पष्ट इशारा काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी दिला होता. यावर काँग्रेसजनांना जे वाटलं ते त्या बोलल्या, असं म्हणत थोरात यांनी त्यांच्या बोलण्याचं समर्थन केलं.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…