Sanjay Raut's suggestive statement
मुंबई : औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ते आज (२४ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांना अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीविषयी विचारलं असता त्यांनी अशा मागण्या होतच असतात. पण औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असे सूचक वक्तव्य केले. मात्र त्यामुळे आता महाविकासआघाडीत पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांनी औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेनेविरोधात भूमिका मांडली होती. त्यानंतर या विषयावरून महाविकासआघाडीत कुरबुरी सुरु झाल्या होत्या. ‘सामना’तून काँग्रेस नेत्यांवर टीकाही करण्यात आली होती.
संजय राऊतांनी मुस्लीम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेस नामांतराला विरोध करत आहे, अशी घणाघाती टीका केली होती. परंतु औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये. औरंगाबादच्या नामांतराचा विषय माझ्यासाठी संपला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…