महाराष्ट्र

संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पोहोचलाच नाही

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तीन दिवस उलटूनही त्यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कायदेशीरपणे संजय राठोड अद्यापही वनमंत्री पदावर कायम आहेत.

दरम्यान, संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सर्व बाजूने टीका होत होती. तसेच पोहोरादेवी येथे राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत नाराजी होती. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर २० दिवसांनी संजय राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, त्यांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे पोहोचलाच नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago