Shiv Sena follows up on the growing problem of traffic congestion at Pari Chowk
पुणे : धायरी (नऱ्हे) येथील पारी चौक परिसरात दररोज होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख महेश राजाराम पोकळे यांनी वाहतूक विभागाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, पारी चौकाजवळील MNGL कंपनीचा CNG पंप हे वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्र बनले आहे. अरुंद रस्ता आणि पंपावर CNG भरण्यासाठी रांगेत लागणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने, परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होतो आहे. परिणामी, शालेय वाहने, ऑफिसकर्मी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गोंधळामुळे अपघाताची शक्यता सुद्धा वाढली आहे.
महेश पोकळे यांनी याबाबत पुढाकार घेऊन वाहतूक विभागाला खालील उपाययोजनांची विनंती केली आहे:
विशेष म्हणजे, या निवेदनासोबत नागरिकांच्या सह्यांचे समर्थनपत्र देखील जोडण्यात आले असून, यावर सिंहगड रोड वाहतूक विभागाचे ठाणे अंमलदार यांनी अधिकृत स्वाक्षरी करत निवेदन स्वीकारले आहे.
स्थानिक जनतेचा या मागणीला मोठा पाठिंबा असून, आता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत वाहतूक सुधारण्यासाठी प्रशासन यादृष्टीने काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…