पुणे : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, आगामी काही तासांत घाटमाथा परिसर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यासंदर्भात पुणे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः सखल भागात राहणारे नागरिक आणि भूस्खलनाचा धोका असलेल्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्यांनी अधिक सावध राहण्याचे सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २० जुलैपर्यंत पुण्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पर्यटक, ट्रेकर्स आणि वाहनचालकांनी त्या भागांमध्ये जाणे टाळावे, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…