पुणे

‘ती खरोखरच हत्या होती का?’, उच्च न्यायालयाकडून हत्येच्या गुन्ह्यातील चौघांची निर्दोष मुक्तता

मुंबई : 12 वर्षांपूर्वी पुण्यातील दोन रहिवाशांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार जणांची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यावेळी, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की न्यायालयांनी प्रथम ही खरोखरच हत्या असल्याचे सत्यापित केले पाहिजे, तसेच न्यायालयाने निदर्शनास आणले की ‘स्टार’ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, त्यांचा मित्र, याचा पुरावा हा विश्वासार्ह नाही.

चार मजुरांनी 2016 मध्ये त्यांच्या शिक्षेविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळण्याची मागणी करताना अतिरिक्त सरकारी वकील वीरा शिंदे यांनी सांगितले की, दोन पीडित आणि त्यांच्या मित्रावर तलवारी आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. या दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. नंतर, पोलिसांनी कथित हल्लेखोरांना अटक केली, ज्यात चार मजुरांचा समावेश आहे, त्यापैकी दोनजण त्यावेळी 20 आणि अन्य दोन 24 वर्षांचे होते.

पुणे न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान 18 साक्षीदार तपासण्यात आले आणि सात आरोपींवर खटला चालवण्यात आला. या हत्येप्रकरणी चौघांना दोषी ठरवण्यात आले होते आणि डिसेंबर 2015 मध्ये तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

न्यायमूर्ती साधना जाधव आणि पी के चव्हाण यांच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने खटल्याच्या सुनावणीदरम्यान एक खूप महत्वाची गोष्ट समोर आणली आणि याकडे लक्ष वेधले की, ज्या डॉक्टरांनी पीडितांची प्रथम तपासणी केली त्यांनी सांगितले होते की, दोघांनाही जागरूक अवस्थेत आणि सुस्थितीत आणले गेले होते आणि त्यांनी हा रस्ता वाहतूकीदरम्यान झालेला अपघात असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी हल्लेखोरांनी तलवारी आणि दगडांनी केलेल्या कथित हल्ल्याबद्दल काहीही सांगितले नव्हते.

तसेच, पीडितांपैकी एकाचे शवविच्छेदन करणाऱ्या दुसर्‍या डॉक्टरांनी स्पष्टपणे मत मांडले की त्याचा मृत्यू हे हत्याकांड आहे असे समजणे फार कठीण आहे, असे उच्च न्यायालयाच्या निकालात म्हटले आहे. पण दुसऱ्या व्यक्तीचे शवविच्छेदन करणाऱ्या दुसऱ्या डॉक्टरांनी हे हत्याकांड असल्याचे सांगितले होते. न्यायालयाने पुढे म्हटले की “पक्ष ही विसंगती दूर करण्यात अयशस्वी ठरला आहे, त्यामुळे खरंच त्याच्या मुळाशी जा आणि ही केस स्वीकारण्यास योग्य आहे की नाही, हे बघा.”

वकील सत्यव्रत जोशी यांनी निदर्शनास आणून दिले की प्रत्यक्षदर्शी मित्राने आपल्या मित्रांवर तलवारीने हल्ला होत असल्याचा दावा केला असतानाही त्याने हस्तक्षेप केला नाही आणि त्याला एकही ओरखडा आला नाही. चौथ्या दोषीसाठी अधिवक्ता के बी कटके यांनी आपले म्हणणे मांडले.

उच्च न्यायालयाने असे मानले की पीडितांपैकी एकाचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि दुसरा मृत्यू हा विघातक असू शकतो, परंतु मित्राचा पुरावा विश्वासार्ह नाही आणि त्याचे वर्तन “अनैसर्गिक” असल्याने त्याची साक्ष संशयास्पद आहे. न्यायालयाने हे देखील निरीक्षण केले की ओळख परेड चार महिन्यांच्या असाधारण विलंबानंतर आयोजित करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने बचाव पक्षाचे सबमिशन स्वीकारले की ट्रायल कोर्टाचा निकाल हा अंदाज आणि अनुमानांनी भरलेला होता आणि त्याच तथ्य आणि पुराव्यांवरून तीन जणांची निर्दोष मुक्तता केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago