पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. दोन कंटेनर आणि एका कारचा झालेला हा अपघात इतका भीषण होता की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या ट्रकने पुढे असलेल्या पिकअप व्हॅनला धडक दिली. त्यामुळे पिकअप पलटी झाला आणि ट्रक पुढे असलेल्या अनेक गाड्यांना धडक देत एका कारवर जाऊन आदळला. या धडकेनंतर भीषण स्फोट झाला आणि मोठी आग लागली.
अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत दोन कंटेनर आणि कार पूर्णतः जळून खाक झाले होते. या कारमध्ये अडकलेले काही लोक जिवंत जळाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
पुण्याचे डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितले की, “सातारा-पुणे महामार्गावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने पंधरा ते वीस वाहनांना धडक दिली. त्यानंतर ट्रक छोट्या कारवर आदळला आणि स्फोट झाला. त्यात कारमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे.” काही जण अडकलेले असून, त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अपघातानंतर मृतदेह बाहेर काढण्याचे आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाहतूक शाखेने महामार्गावरील वाहनांना वळविण्याची व्यवस्था केली आहे.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…