पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून येत्या ४८ तासात ते तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने येत्या ४-५ दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कोकण, घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाकडून आज पुणे रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार-अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आजपासून पुढील पाच दिवस पुण्याला ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे.
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…