Water release from Khadakwasla dam increased; Citizens urged to be vigilant
पुणे : खडकवासला धरण प्रशासनाने मंगळवारी दुपारी मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ केली आहे. दुपारी ४:०० वाजेपूर्वी १९,३३४ क्युसेक इतका असलेला विसर्ग २४,८२७ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला असल्याची माहिती धरण अधिकाऱ्यांनी दिली.
पाटबंधारे विभागाने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात जलसाठा वेगाने वाढत आहे. यामुळे धरणातील जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग वाढविणे आवश्यक झाले आहे. पावसाची तीव्रता आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावरून विसर्गात पुढील काही तासांत आणखी बदल होऊ शकतात, असा इशारा विभागाने दिला आहे.
नदीकाठच्या नागरिकांनी व शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे, तसेच नदीपात्राजवळ जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अचानक पाण्याची पातळी वाढल्यास जनजीवन आणि शेतीला धोका निर्माण होऊ शकतो. पुण्यातील स्वारगेट येथील मुठा कालवे सिंचन उपविभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी सांगितले की, “नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्राजवळ वावरू नये, तसेच पुलांखाली किंवा धोकादायक ठिकाणी वाहन पार्क करू नयेत.”
सध्या धरणातून विसर्ग वाढल्यामुळे मुठा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे शहरासह खडकवासला, सिंहगड रस्ता, वारजे, कोथरूड, तसेच नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्क राहणे गरजेचे असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी सकाळी धरणातून ११,८७८ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. दुपारपर्यंत तो १९,३३४ क्युसेकवर गेला आणि नंतर संध्याकाळी २४,८२७ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे.
धरणक्षेत्रात आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना वारंवार सूचना पाळण्याचे आणि सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…