Pankaja Munde- Dhananjay Munde sparks controversy again
बीड: धनंजय मुंडे यांनी आपण वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळवून दिल्याचा दावा केला आहे तर पंकजा मुंडे यांच्याकडून स्वतः प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी मिळाल्यानंतर श्रेयवादावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. आहे. यावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा समोरा-समोर आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुंडे बहीण-भावा मधील वाद काही काळ थांबला होता. मात्र, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या थकहमी वरून पुन्हा एकदा हा संघर्ष पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री, सहकार मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि साखर संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाख रूपये थकहमी मंजूर केली आहे. यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं राज्यातील ३२ साखर कारखान्यांना थकहमी मंजूर करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभारही मानले आहेत.
साखर कारखान्याच्या विषयात राजकारण आणणार नसल्याचे धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवले. शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केल्याचा दावा करत आता तरी शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे पैसे देऊन ‘वैद्यनाथ’सांभाळावा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. पुढे बोलताना मुंडे म्हणाले कि पंकजा मुंडेनी पाठपुरवठा इथे बसून केला कि परदेशातून केला हे माहित नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे या दोघांनी कष्टाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभा करून कारखान्याला आघाडीवर नेले होते. मात्र, पंकजा मुंडे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आल्यानंतर ५ वर्षांतच कर्मचाऱ्यांवर थकीत पगारासाठी उपोषणाची वेळ आली, हे दुर्दैव आहे. आता तरी गळीत हंगाम सुरू करून परिसरातील ऊसाचे गाळप करावे, असं देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…