Nine members of a family found dead in Sangli
सांगली : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील नऊ सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आले. सुरुवातीला या सगळ्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, हे कुटुंब आर्थिक कारणांमुळे तणावत होते. त्यामुळेच या कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे हा भयंकर प्रकार घडला आहे.
मिरज येथील शासकीय रुग्णालयात या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. म्हैसाळ येथील डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्या कुटुंबातील आठ ते नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आक्काताई वनमोरे, डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, रेखा माणिक वनमोरे, प्रतिमा वनमोरे, आदित्य वनमोरे आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना पोपट वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, शुभम पोपट वनमोरे यांचा समावेश आहे.
सांगलीचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम म्हणाले, आम्हाला एका घरात नऊ मृतदेह सापडले आहेत. एका ठिकाणी तीन मृतदेह सापडले आहेत, तर सहा घरात इतर वेगवेगळ्या ठिकाणी सापडले आहेत. या कुटुंबाचे म्हैसाळ येथील नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिकानगरमध्ये एक तर राजधानी कॉर्नर येथे दुसरे घर आहे. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एका घरात सहा जण विष घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह आढळले. त्यानंतर एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. माणिक यल्लप्पा व्हनमोरे आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह त्यांची आई, पत्नी आणि मुलांचा यात समावेश आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…