Pune: Trekker Dies Of Heart Attack At Torna Fort
नाशिक : के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात अस्मिता संदीप रौदळ-पाटील (वय १८) या विद्यार्थिनीने मुलींच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अस्मिता अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मृत मुलीच्या पालक व नातेवाईकांनी वसतिगृहाबाहेर थांबून यासंबंधी जाब विचारला. त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली.
अस्मिताच्या वडिलांचा सटाण्यात शेती व ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तिची आई गृहिणी आहे. अस्मिताला एक १५ वर्षांची बहीण व १० वर्षांचा लहान भाऊ आहे. अस्मिता दोन दिवसांपूर्वी तिच्या घरी आई वडिलांना भेटून महाविद्यालयात दाखल झाली होती. नातेवाईकांनी सांगितले की ती अत्यंत हुशार, शांत व सोज्वळ स्वभावाची होती आणि ती असे टोकाचे पाऊल उचलू शकत नाही.
अस्मिताच्या आत्महत्येमागे काहीतरी वेगळे कारण असल्याची शक्यता व्यक्त करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच वसतिगृहाच्या महिला रेक्टर माहिती लपवत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. महाविद्यालय व्यवस्थापनाने घटना घडल्याची माहिती अस्मिताच्या आई-वडिलांना न देता नातेवाईकांना का दिली? पोलिसांना घटनास्थळी दाखल होऊ न देता मृतदेह परस्पर जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी का पाठवला? असे प्रश्न विचारल्यावर महाविद्यालय प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, रेक्टरला पोलीस अटक करीत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली.
वसतिगृहाबाहेर शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत पालक व नातेवाईक थांबून राहिले होते. वसतिगृहाच्या बाहेर गर्दी वाढल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. मृतदेह रूमच्या बाहेर काढते वेळी हॉस्टेल प्रशासनाने पोलिसांना कळवणे गरजेचं असताना इतर मुलींच्या साहाय्याने दरवाजा तोडत या मुलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. रेक्टरवर गुन्हा दाखल न केल्यास बदलापूरसारखं आंदोलन करू, असा इशारा मुलीच्या वडिलांनी प्रशासनाला दिला.
अस्मिताचा मृतदेह विच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला होता. परंतु तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही विच्छेदन होऊ देणार नाही, असे नातेवाईकांनी सांगितले. महाविद्यालय व्यवस्थापनाने परस्पर मृतदेह खाली का उतरवला असा सवालही नातेवाईकांनी उपस्थित केला. अस्मिताने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असावी अशी शक्यता व्यक्त करीत चिठ्ठी गायब करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. दरम्यान नातेवाईकांनी आडगाव पोलिसांकडे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…