नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रंभाबाई आनंदा काळे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव असून त्या निफाड येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या.
रंभाबाई काळे या निफाडमधील मामलेदार चौक परिसरात वास्तव्यास होत्या. त्या अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा भाचा प्रवीण घायाळ यांनी २४ फेब्रुवारी रोजी निफाड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत रंभाबाई यांच्या मोबाईलचा सीडीआर (Call Detail Record) तपासला. त्यामध्ये काही संशयास्पद क्रमांक समोर आल्यानंतर पोलिसांनी निफाड येथील अरुण बाजीराव ढेपले (वय ४०) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीदरम्यान अरुण ढेपले याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला सोडून देण्यात आले. मात्र, प्रकरण गंभीर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने निफाडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान अरुण ढेपले याने पोलिसांसमोर धक्कादायक कबुली दिली. त्याने रंभाबाई काळे यांचा खून करून निफाडजवळील जुना देवपूर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत मृतदेह फेकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवली असता विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आला.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अरुण ढेपले हा दूध विक्रीचा व्यवसाय करतो. दूध देण्याच्या निमित्ताने त्याची आणि रंभाबाई काळे यांची ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला. या वादातूनच त्याने रंभाबाई यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणाचा अधिक तपास निफाड पोलीस करत आहेत.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…