bail granted to narayan rane decision by mahad court
रायगड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर महाड सत्र न्यायालयाने राणेंना सशर्त जामीन मंजूर केला. असे असले तरीही न्यायालयाने राणे यांना महिन्यातून दोन वेळा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. राणे यांना आज (३० ऑगस्ट) अलिबाग पोलिस स्थानकात हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला आहे.
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राणेंना अटक करण्याचे आदेश काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. नारायण राणेंवर कारवाई केल्यानंतर महाड न्यायालयाने सुनावणीत राणेंना अटीशर्ती ठेवून जामीन मंजूर केला होता. नारायण राणे आज अलिबाग पोलिसांसमोर हजेरी लावणार असल्याची माहिती मिळाली आहे. नारायण राणे अलिबागला येणार असल्यामुळे या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील बघायला मिळत आहे.
काय आहे प्रकरण?
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली होती. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले होते. ही कारवाई केल्यानंतर महाड न्यायालयाने राणेंना सशर्त जामीन मंजूर केला होता.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…