नांदेड : एका प्रेमीयुगुलाने घरच्यांकडून लग्नासाठी विरोध होत असल्याने आत्महत्या केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. दत्ता गणेश भिंगोरे (वय 24) आणि शारदा खंडू माने (वय 25 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारवाडी येथील दत्ता गणेश भिंगोरे आणि शारदा खंडू माने या दोघांमध्ये मागील अनेक दिवसापासून प्रेमप्रकरण सुरु होतं. मात्र, ही युवती विवाहित होती आणि आपल्या पतीसोबत होणाऱ्या भांडणामुळे वैतागून मागील 4 वर्षांपासून कामारवाडी येथे मामाच्या घरी राहात होती. दरम्यान, या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळताच या युवकाच्या घरच्यांनी दोघाच्या प्रेमसंबंधाला विरोध केला. मात्र त्याला शारदासोबतच लग्न करायचे होते. त्यानंतर, युवकाच्या आई-वडिलांनी तात्काळ त्याचे दुसरीकडे लग्न ठरवून टाकले.
अखेर शनिवारी सकाळी या प्रेमीयुगुलाने टोकाचे पाऊल उचलत गावालागत असलेल्या एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांचे मृतदेह खाली उतरवले आणि पंचनामा करून त्यांचे मृतदेह हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…