मुंबई : 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. 11 ऑगस्टपासून एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पास काढल्याची आकडेवारी रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यापासून 15 ऑगस्टपर्यंत तब्बल 1 लाख 21 हजार 197 नागरिकांनी रेल्वेचे मासिक पास काढले आहेत. मध्य रेल्वेवर 79 हजार 8 जणांनी तर पश्चिम रेल्वेवर 42189 जणांनी पास काढले आहेत. मध्य रेल्वेच्या डोंबिवली तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकात पास काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या वाढलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.
सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर लोकलच्या 1612 फेऱ्या सुरु आहेत. त्या वाढवून 1686 फेऱ्या दर दिवशी चालवण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर सध्या धावत असलेल्या 1201 लोकल फेऱ्या वाढवुन 1300 करण्यात आल्या आहेत. या अतिरिक्त लोकल फेऱ्या सोमवारपासून चालवल्या जातील.
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…