मुंबई

अनिल देशमुख यांना जामीन मिळूनही तुरुंगातच राहावे लागणार, कारण…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला, असे असूनही त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आणि 100 कोटी वसुलीचे आरोप असल्यामुळे अनिल देशमुख अटकेत आहेत. ईडी आणि सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता देशमुखांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला असला तरीही त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे, कारण त्यांना केवळ ईडीने दाखल केलेल्या गुन्हांमधून जामीन मंजूर झाला आहे. मात्र सीबीआयकडून अद्याप त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात त्यांना जामीन मिळालेला नाही. या कारणामुळे सध्या त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही.

देशमुख यांना आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे, कारण भ्रष्टाचारप्रकरणी त्यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी सुरू आहे. 2019 ते 2021 या कालावधीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

‘बार्टी’ कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…

18 तास ago

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

18 तास ago

भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…

19 तास ago

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ : वेग, सुरक्षितता आणि आधुनिक अभियांत्रिकीचा संगम

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…

19 तास ago

राज्यात सात जिल्ह्यांत एमआरआय सेवेचे लोकार्पण ; ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवेचा विस्तार

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…

19 तास ago

फार्मर आयडी :२० मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन, अन्यथा योजनांचा लाभ बंद

मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…

19 तास ago