Election Commission Of India
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी (पूर्व) या मतदारसंघात ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारी मतदान प्रक्रिया नि:पक्षपणे पार पडण्याच्या दृष्टीने मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वस्तरीय कार्यवाही सुरु आहे. याचाच भाग म्हणून मतदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण असणाऱ्या मतदान यंत्रांचे ‘द्वितीय सरमिसळीकरण’ (Second Randomization) निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार केंद्रीय निरीक्षक देवेश देवल यांच्या उपस्थितीत आज झाले.
अंधेरी (पूर्व) मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यवाहीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील आणि संबंधित उपस्थित होते. हे सरमिसळीकरण नि:पक्षपणे व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाच्या संगणकीय प्रणालीद्वारे (Computer Software) करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अजित साखरे यांनी दिली.
या पोटनिवडणूक प्रक्रियेकरिता २५६ मतदान केंद्रे असणार असून या मतदान केंद्रांवर ३३३ बॅलेट युनिट, ३३३ कंट्रोल युनिट आणि ३५९ व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघात जेवढ्या यंत्रांची आवश्यकता आहे, त्यापेक्षा सुमारे २० टक्के अतिरिक्त बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आहेत. तर सुमारे ३० टक्के अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्रांची तजवीज करण्यात आली आहे. जेणेकरून कोणत्याही यंत्रामध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास पर्यायी यंत्रांची व्यवस्था सहजपणे होऊ शकेल. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान उपयोगात येणारी यंत्रे ही सशस्त्र सुरक्षादलाच्या कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास देखरेख ठेवण्यात येत आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोटनिवडणुकीबाबतची विविध स्तरीय प्रक्रिया निर्धारित वेळापत्रकानुसार वेळोवेळी सुरु आहे. त्यानुसार पोटनिवडणूकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याद्वारे सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही अव्याहतपणे सुरु आहे. यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन आणि तेथील अधिकारी व कर्मचारी हे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देखील कार्यरत असतील. मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी ३ नोव्हेंबर रोजी मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही प्रक्रिया अधिकाधिक सुदृढ करावी, असे आवाहन केले आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…