मुंबई

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेचे लेखक अभिषेक मकवाना यांची आत्महत्या

तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिकेचे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली आहे. अभिषेक यांनी कर्ज घेतल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. अभिषेक मकवाना यांना कर्ज घेतल्यापासून फोनवरुन धमक्या दिल्या जात होत्या. कर्ज फेडण्यासाठी त्यांच्यावर वारंवार दबाव आणला जात होता. अभिषेक मकवाना हे सायबर फ्रॉडचे बळी ठरले होते, असंही त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

अभिषेक मकवाना यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद चारकोप पोलिसांनी केली होती. मात्र आता ही आत्महत्या असल्याचं समोर आलं आहे. २७ नोव्हेंबरला अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरातल्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांच्या भावाने सांगितले कि, “अभिषेकचा मृत्यू झाल्यानंतर मी त्याचे काही मेल चेक केले. त्यामध्ये अभिषेकला अनेक नंबर्सवरुन फोन येत असल्याचं समजलं. तसंच ते सगळे फोन कॉल्स कर्ज फेडण्यासंदर्भातले होते. एक कॉल बांगलादेशातून तर एक कॉल म्यानमारमधून आल्याचंही मला समजलं. इतर कॉल्स भारतातल्या इतर भागांमधून येत होते असंही समजलं.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago