15 killed in wall collapse due to landslide in mumbais chembur
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने थैमान घातलं असून चेंबूर भागात भिंत कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री 1 वाजता ही घटना घडली. वाशिनाका येथील न्यू भारत नगरमध्ये ही घटना घडली. एक झाड भिंतीवर पडल्यानंतर भिंत कोसळली. यातील मृतांची संख्या आता १2 वर पोहोचली आहे. तर विक्रोळीतही 3 लोकांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंतीचा ढिगारा बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. आतापर्यंत 16 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.
हवामान खात्याकडून आजदेखील मुंबई व आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच लोकांना समुद्रापासून दूर रहाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात २५३.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…