15 killed in wall collapse due to landslide in mumbais chembur
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने थैमान घातलं असून चेंबूर भागात भिंत कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री 1 वाजता ही घटना घडली. वाशिनाका येथील न्यू भारत नगरमध्ये ही घटना घडली. एक झाड भिंतीवर पडल्यानंतर भिंत कोसळली. यातील मृतांची संख्या आता १2 वर पोहोचली आहे. तर विक्रोळीतही 3 लोकांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंतीचा ढिगारा बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. आतापर्यंत 16 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.
हवामान खात्याकडून आजदेखील मुंबई व आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच लोकांना समुद्रापासून दूर रहाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात २५३.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…