महाराष्ट्र

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा कहर सुरूच, आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पावसाने कहर केला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. १ जूनपासून आतापर्यंत मुसळधार पावसामुळे 120 जणांचा मृत्यू झाला असून 240 जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने गुरुवारी मुंबई, पालघर, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर, वाशीम आणि यवतमाळ येथे अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. तसेच गावांमध्ये पाणी शिरले आहे. अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर लोकांच्या अडचणीही वाढल्या आहेत.

अनेक ठिकाणी अतिवृष्टी :
राज्यात अतिवृष्टी आणि पुरासारख्या घटनांमध्ये 120 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 240 जनावरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. पावसामुळे 300 हून अधिक गावांचे नुकसान झाले आहे. तसेच 95 जण जखमी झाले आहेत. त्यात 19 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पालघर, वर्धा आणि नाशिकमध्ये तीन हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

NDRF च्या एकूण 13 टीम तैनात :
त्याचवेळी महाराष्ट्रात मदत व बचावकार्यासाठी NDRF च्या एकूण 13 टीम तैनात आहेत. ज्यामध्ये मुंबई-ठाणे, रायगड, सांगली आणि कोल्हापूर येथे एनडीआरएफच्या दोन पथके तैनात आहेत. तर प्रत्येकी एक टीम पालघर, रत्नागिरी, सातारा येथे आहे. एसडीआरएफच्या दोन तुकड्याही राज्यात तैनात आहेत. ही पथके नांदेड आणि गडचिरोली येथे तैनात करण्यात आली आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे आकस्मिक निधन, चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…

16 तास ago

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…

16 तास ago

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…

16 तास ago

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

2 दिवस ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

4 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 महिना ago