No police recruitment on contract basis - Deputy Chief Minister Devendra Fadnavis
पुणे : राज्यात ‘पोलिस इर्मजन्सी सर्व्हिस’ची नवीन यंत्रणा उभी करण्याची घोषणा गेल्या वर्षी गृहमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार राज्यात सध्या पोलिसांना एखाद्या घटनेबाबत माहिती कळविण्यासाठी ‘१००’ नंबरवर कॉल केला जातो. मात्र, नवीन यंत्रणेनुसार लवकरच ‘१००’ नंबर कालबाह्य होणार असून, ‘११२’ हा नंबर कार्यान्वित केला जाणार आहे. यामध्ये केवळ नियंत्रण कक्षाचा नंबरच बदलणार नसून, त्यानंतर पोलिसांकडून केली जाणारी कार्यवाहीदेखील पूर्णत: बदलणार आहे.
सध्या पोलिस नियंत्रण कक्षाला एखादी घटना कळवल्यानंतर, तेथून संबंधित पोलिस ठाण्याला माहिती दिली जाते. त्यानंतर तेथून ‘मार्शल’ घटनास्थळी जातात. नवीन योजनेनुसार सर्व पोलिस ठाण्यांतील ‘मार्शल’ कर्मचारी नियंत्रण कक्षाशी ‘जीपीएस’मार्फत जोडलेले असणार आहेत. एखादी घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षातूनच त्या घटनास्थळापासून जवळ असलेल्या ‘मार्शल’ कर्मचाऱ्यांस थेट माहिती कळवली जाईल. यासाठी ‘मार्शल’ कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक ‘टॅबलेट’ दिला जाणार आहे. त्या ‘टॅब’द्वारेच पुढील सर्व व्यवहार पार पाडले जाणार आहेत.
नवीन पोलिस इमर्जन्सी सर्व्हिससाठी राज्यभरातील पोलिस ठाण्यांसाठी एक हजार ५०० कार आणि दोन हजार २०० दुचाकी वाहने खरेदी करण्यात येत आहेत. यातील काही वाहने पुण्यात दाखल झाली आहेत. या सेवेअंतर्गत कारमध्ये मोठा ‘टॅब’ आणि दुचाकीवरील मार्शल कर्मचाऱ्याकडे छोटा ‘टॅब’ दिला जाणार आहे.
जुनी कार्यपद्धती :
नवीन कार्यपद्धती :
या नवीन गोष्ट सामान्य नागरिकांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…