जळगाव

भीषण अपघात! दुचाकी घसरल्याने रस्त्यावर पडलेल्या मुलाला ट्रकने चिरडले

जळगाव : ट्रकने दुचाकीवर मागे बसलेल्या शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. जळगावकडून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. सुजय गणेश सोनवणे (वय १३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

मोहाडी येथील सुजय गणेश सोनवणे हा सेंट टेरेसा शाळेत इयत्ता ४ च्या वर्गात शिकत होता. बुधवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. राजू गवळी यांच्याबरोबर दुचाकीने सुजय शाळेतून घरी येत होता. मोहाडी रस्त्यावर रस्त्यालगत पडलेल्या खडीवर दुचाकी घसरली. त्यामुळे, दुचाकीवर मागे बसलेला सुजय हा रस्त्यावर पडला. याचदरम्यान समोरून येणार्‍या ट्रकने सुजयला चिरडले व त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून घटनास्थळावरून पलायन केले.

दरम्यान, सुजयचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आक्रोश करत आहेत. स्थानिक नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दुचाकी व ट्रक ताब्यात घेतली. या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा परिषद सदस्य तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मुलगा प्रतापराव पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 दिवस ago

शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने द्यावे – मंत्री संजय राठोड

मुंबई : जलसंधारण महामंडळ आणि शासन अंतर्गत प्रकल्पांच्या बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने देण्याच्या सूचना…

4 दिवस ago

कामगारांना सक्तीची सेवानिवृत्ती देणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करा, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश

मुंबई : नाशिक येथील बजाज इलेक्ट्रिक कंपनीतील ४१ कायमस्वरूपी कामगारांना व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता…

4 दिवस ago

बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन !

मुंबई : प्रतिकूल परि‍स्थितीवर मात करत बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी दहावीत यश संपादन करत सकारात्मक जीवनाचा…

4 दिवस ago

‘बार्टी’ कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…

2 आठवडे ago

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

2 आठवडे ago