महाराष्ट्र

कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ऑरेंज अलर्ट जारी, ‘या’ जिल्ह्यांत पुढील 3-4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पुढच्या 5 दिवसासाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24 तासात कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३-४ तासांमध्ये पालघर आणि रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 3-4 तासांत नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि पुण्यातील घाट भागात मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे इ. सहीत उर्वरित ठिकाणी उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होणार आहे. मात्र, परत 4,5 दिवसापासून कोकणात इशारे देण्यात आले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago