Chance of heavy rain with thunderstorms
मुंबई : राज्यात 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (१२ सप्टेंबर) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या भागात पुढील 3-4 तास मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात हे आज सकाळी 9.30 वाजताच्या नवीनतम सॅटेलाइट निरीक्षणावरून दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळला आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…