FIR against former Maharashtra home minister Anil Deshmukh
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या आरोपाची सीबीआयनं चौकशी केली. शनिवारी सकाळी अनिल देशमुख यांच्या मुंबईत बांद्रा, वरळी तसेच नागपूर अशा १० ठिकाणी छापेमारी केली आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या प्राथमिक चौकशीसाठी अनिल देशमुख यांना बोलावलं होत. त्यावेळी देशमुख यांची सुमारे सात तास चौकशी सुरु होती. आवश्यक असल्यास चौकशी पथक त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधू शकेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले होते. ११ एप्रिल रोजी सीबीआयने देशमुख यांच्या दोन वैयक्तिक सहाय्यकांची चौकशी केली होती. एजन्सीने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आणि पोलिस उपायुक्त यांचेही जबाब नोंदवले होते.
सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या निवासस्थानी बोलवलं होतं तसेच त्यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं होतं. देशमुख म्हणाले होत की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे, असे अनेक आरोप परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहिलं होतं.
त्यानंतर हायकोर्टाने आदेशात म्हटलं होतं की, “अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहे. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
या प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबाने केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती. मग अनिल देशमुख यांची चौकशी झाली होती.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…