Fatal accident involving bus and Eicher truck in Jalna
जालना : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. अंबडपासून १० किमीवर वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून १४ जण जखमी झाले आहेत. गेवराईहून अंबडकडे जाणाऱ्या बसने आयशर ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती होती की बस आणि आयशर ट्रकचा चक्काचूर झाला आहे.
जालना आणि वडीगोद्रीदरम्यान शहापूर गाव असून तिथे हा अपघात झाला. गेवराईकडून बस अंबडकडे जात असताना जालन्यावरुन समोरुन येणारा मोसंबीने भरलेला आयशर ट्रक यांची समोरासमोर धडक झाली आहे. बसमध्ये एकूण २० ते ३० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहे. जखमींना अंबड शहरातील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…