महाराष्ट्र

व्यापाऱ्याने पैसे न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, हा धक्का सहन न झाल्याने मोठ्या भावाचा मृत्यू

अमरावती : अमरावतीतील अंजनगाव सूर्जी तालुक्यातील धनेगाव येथील भुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकरी अशोक भुयार यांच्या अंत्यसंस्कारावरुन परत येताना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने मोठ्या भावाचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे एकाच दिवशी दोघा भावांना अखेरचा निरोप देण्याची वेळ भुयार कुटुंबावर ओढवली आहे. देशभरात शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन पेटलं असतानाच अमरावतीतून ही दुःखद बातमी आली.

व्यापाऱ्याने संत्र्याचे पैसे न दिल्याने आणि पोलिसांनीही सहकार्य न केल्याचा आरोप अशोक भुयार यांनी केला होता. व्यापारी आणि पोलिसांनी मारहाण केल्याचा दावाही त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. अमरावतीतील मोठे नेते बच्चू कडू यांना पत्र लिहून शेतकरी अशोक भुयार यांनी काल विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी चिठ्ठीतून भुयार यांनी केली आहे.

भुयार यांच्या आत्महत्येनंतर अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याला गावकऱ्यांनी घेराव घातला होता. आत्महत्या प्रकरणी दोषी असलेल्या पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव यांच्यासह संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अशोक भुयार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र लहान भावाच्या मृत्यूचा धक्का संजय भुयार यांना सहन झाला नाही. अंत्यसंस्कारावरुन परत येताना हार्ट अटॅक आल्याने संजय यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 दिवस ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 आठवडा ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 आठवडे ago

शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने द्यावे – मंत्री संजय राठोड

मुंबई : जलसंधारण महामंडळ आणि शासन अंतर्गत प्रकल्पांच्या बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने देण्याच्या सूचना…

2 आठवडे ago

कामगारांना सक्तीची सेवानिवृत्ती देणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करा, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश

मुंबई : नाशिक येथील बजाज इलेक्ट्रिक कंपनीतील ४१ कायमस्वरूपी कामगारांना व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता…

2 आठवडे ago

बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन !

मुंबई : प्रतिकूल परि‍स्थितीवर मात करत बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी दहावीत यश संपादन करत सकारात्मक जीवनाचा…

2 आठवडे ago