महाराष्ट्र

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई : १४ व्या विधानसभेची मुदत आज २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद देण्यात यावे, यासाठी दबाव टाकला जात आहे. तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले जावे, अशी मागणी होत आहे. आज महायुतीचे नेते राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असून नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत राज्यात काळजीवाहू सरकार असेल.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे राजीनामा देण्यासाठी राज्यभवनावर दाखल झाले आहेत. त्याचदरम्यान, देवेंद्र फडणवीस देखील सागर बंगल्यावरुन राजभवनामध्ये पोहोचले आहेत. महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेची आज मुदत संपत आहे. त्यामुळे नवे सरकार स्थापन करण्याआधी एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील राजीनामा देणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला असला तरी सरकार स्थापनेपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील.

राजीनाम्याची प्रक्रिया ही संविधानिक प्रक्रिया असते. त्याच्यामध्ये निकाल लागल्यानंतर जे विद्यमान सरकार असतं त्यांना विधीमंडळाचा राजीनामा द्यावा लागतो. ते मंत्रिमंडळ विसर्जित केलं जातं. त्यानंतर नव्या मंत्रिमंडळाचा तसेच नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडतो आणि नवीन विधिमंडळ स्थापित होतं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago