Decision to cancel Maghi Yatra of Pandharpur
कोरोना प्रादुर्भावामुळे नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाची माघी यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. याकाळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. २२ आणि २३ फेब्रुवारीला विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी वारकरी संप्रदायाच्या चैत्री, आषाढी व कार्तिकी या मोठ्या यात्रा होऊ शकल्या नव्हत्या. अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने कोरोनाचे नियम 29 फेब्रुवारी पर्यंत सुरू ठेवल्याने यात्रा भरण्यास मनाई करण्यात आली आहे. माघी यात्रेचा सोहळा 23 फेब्रुवारी रोजी होत असल्याने या यात्रा भाविकांविना करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणेच माघी यात्रेवरही भाविकांसाथी निर्बंध लावण्यात आले आहेत.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…