CM Uddhav Thackeray press conference
मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर महाविकास आघाडी सरकारने सुद्धा पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, राज्यात या सरकारने अघोषित आणीबाणी लावली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, राज्यात कुठेही जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही. पण, विरोधी पक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या नावात पक्षाच्या आधी विरोधी आहे, त्या शब्दाला त्यांना जागावं लागतं. विरोधक म्हणतात राज्यात अघोषित आणीबाणी आहे. राज्यात अशी अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात काय घोषित आणीबाणी आहे का? कारण ज्या पद्धतीने शेतकरी त्यांच्या न्यायहक्कांसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यासोबत बोलणं सोडाच पण भर थंडीत त्यांना तिथे रहावं लागत आहे त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात येत आहेत हे मला वाटत नाही की सद्भावनेचे लक्षण आहे.
विरोधकांचं मागचं वर्ष सरकार कधी पडतं आणि सरकार कधी पडणार याचे मुहूर्त काढत बसण्यातच गेलं. त्यामुळे कदाचित त्यांनी सरकारने काय-काय कामं केली हे बघितले नसेल. काही दिवसांपूर्वी याच सभागृहात गेल्या वर्षभरात सरकारने काय काम केले, त्याची पुस्तिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली आहे.
केंद्राकडून जीएसटीचे पैसे येणे बाकी आहेत. केंद्राने वन-नेशन वन-टॅक्सचं ठरवलं होतं ते पाळायचं नाही. महाराष्ट्रावर इतकी नैसर्गिक संकट आली. सरकार सतत अडचणीतून मार्ग काढून पुढे चाललं आहे. मी विरोधकांची आज पत्रकार परिषद पाहिली. त्या पत्रकार परिषदेत अजिबात उत्साह नव्हता, अतिशय चेहरा पडलेला होता. ते सुद्धा डिमॉरलाइज झाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…