Power outages in Mumbai suburbs due to power grid failure
मुंबई : मागील वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत झालेल्या ‘पॉवर कट’मध्ये चीनचा सहभाग होता. हा दावा अमेरिकेतील एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. चीनच्या सायबर अटॅकमुळे तेव्हा मुंबईत पॉवर कट झाला होता. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या संदर्भात तो घातपातच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याचा मोठा फटका रुग्णालये, शेअर बाजार व अन्य सेवांना बसला होता. तब्बल अडीच तास प्रयत्न केल्यानंतर हा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. यामागे घातपाताचा संशय देखील त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. आता ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात त्या ‘पावर कट’मध्ये चीनचा हात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
वृत्तानुसार, वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध रेकॉर्डेड फ्युचर या २००९ मध्ये स्थापन झालेल्या सायबर सिक्युरिटी कंपनीने घेतला आहे. या सायबर हल्ल्यातील अनेक मालवेअर अॅक्टीव्ह करण्यात आले नव्हते. म्हणजेच नियोजित हल्ल्याच्या काही टक्के हल्लाच यशस्वी झाला होता. मात्र या मालवेअर ट्रेसिंगमध्ये कोड रिस्ट्रीक्शन असल्याने यासंदर्भातील संपूर्ण माहिती काढण्यात कंपनीला अपयश आल्याचेही वृत्तात म्हटलं आहे. वीजपुरठ्यातील दाब आणि मागणीवर नियंत्रण मिळवणाऱ्या यंत्रणांवर हल्ला करुन १० ठिकाणचे कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय भारतामधील दोन बंदरांच्या यंत्रणांवरही हल्ला करण्यात आल्याचं दिसून आलं.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं कि, “राज्य सरकारनं त्याचवेळी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. तेव्हा मला वेड्यात काढण्यात आलं होतं. पण काहीतरी गडबड आहे ही शंका आम्हाला आली होती. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज येणार आहे.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…