“काँग्रेस हा चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली. मात्र लॉटरी लागूनही त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही,” असा टोला भाजपचे खासदार सुजय विखे यांनी लगावला आहे. तसेच तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वांचं समाधान करणे अवघड असते. तसेच ज्या खात्याचा मंत्री त्याच पक्षाचे काम होते. त्यामुळे बाकीचे नाराज होतात, असेही सुजय विखे म्हणाले.
हे सर्व स्वार्थासाठी एकत्र आले आहे. यामुळे महाराष्ट्राचा विकास थांबेल, त्यामुळे त्यांचा जो काही अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांनी सोडवून घ्यावा. मंत्री समाधानी आहेत. मात्र आमदार नाराज आहे. तसेच आता एका पक्षाची नाराजी बाहेर आली आहे. मात्र पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल,” असं देखील सुजय विखे म्हणाले.
त्याचबरोबर मी कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यात फिरत आहे, काही बैठका घेतल्या त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मी माझ्या कामासाठी फिरत नाही. मी जनतेसाठी रस्त्यावर उतरून काम करत आहे. मात्र जर माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर मी तयार आहे. पण माझ्या एकट्यावरच नव्हे तर पारनेरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 300 लोकांच्या उपस्थितीत कोविड सेंटरचं उद्घाटन केलं. त्यांच्यासह उपस्थित असलेल्या 300 लोकांवरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी खासदार विखेंनी केली.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…