औरंगाबाद

औरंगाबादमध्ये धावत्या बसला भीषण आग, चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे 28 जण सुखरूप

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एक मोठा अपघात टळला. येथील गंगापूर तालुक्यात काल रात्री एका चालत्या एसटी बसला अचानक आग लागली. मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अर्थात एसटीच्या बस चालकाने परिस्थिती अत्यंत सावधपणे हाताळली आणि बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. घटनेच्या वेळी बसमध्ये 28 जण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ढोरेगाव येथील नाशिकहून हिंगोलीकडे जाणाऱ्या एसटी बसला आज पहाटे एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली, मात्र सुदैवाने बसमधील 28 जणांना काहीही झाले नाही आणि सर्वजण सुखरूप बचावले.

नाशिक-हिंगोली बस रविवारी रात्री नाशिकच्या आगार क्रमांक-१ मधून निघाली. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास बस गंगापूर तालुक्यातील धोरेगाव येथे आली असता इंजिनमधून धूर येऊ लागला. हा प्रकार पाहताच चालकाने बस थांबवली. आग लागल्याचे समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, चालक आणि वाहकाने काळजीपूर्वक बसमधील २६ प्रवाशांना खाली उतरवले. सर्व प्रवासी खाली उतरून बसपासून काही अंतरावर सुरक्षित ठिकाणी गेले. यादरम्यान संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली. आग एवढी भीषण होती की, पाहता पाहता आगीने संपूर्ण बसला कवेत घेतले. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. सुदैवाने ड्रायव्हर आणि कंडक्टरसह सर्व 26 प्रवासी सुखरूप आहेत. दरम्यान, आगीची माहिती मिळताच एसटीचे अधिकारीही सतर्क झाले आणि त्यांनी घटनास्थळ गाठले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago