Allies set the trap of Shiv Sena's death - Nitesh Rane
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच फायदा झाला. शिवसेनेच्या हाती काहीच लागले नाही, असं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करत जोरदार टीका केली आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, “ठीक आहे आम्ही कमी पडलो. पण मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला भोपळा मिळाला आहे. मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचला आहे. बाकी मैदानात परत भेटूच.”
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून केवळ अमरावतीत एकमेव जागेवर उमेदवार उभा करण्यात आला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नातेवाईक असलेल्या आणि अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या किरण सरनाईक यांच्याकडून श्रीकांत देशपांडे यांना पराभव स्वीकारावा लागला. तर उर्वरित जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार होते. हे सर्व उमेदवार निवडून आले असले तरी शिवसेनेला मात्र एकही जागा मिळाली नाही.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…