अहिल्यानगर : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कृषि महाविद्यालय, अहिल्यानगर आणि डी. वाय. पाटील कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठ, तळसंदे (कोल्हापूर) यांच्यात आधुनिक ऊस रोपे उत्पादन व कृषि संशोधन केंद्र स्थापनेसाठी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार बुधवारी (३० जुलै) अहिल्यानगर येथे झाला.
या करारानुसार, दोन्ही संस्था संशोधन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके व शिबिरे यांच्या माध्यमातून ऊस लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करतील. तसेच गुणवत्तापूर्ण ऊस रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. यामुळे शाश्वत ऊस शेतीला चालना मिळेल, असा विश्वास संस्थांनी व्यक्त केला.
सामंजस्य करारावर डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) के. प्रथापन आणि विखे पाटील फाउंडेशनचे संचालक (तांत्रिक) प्रा. सुनील कल्हापुरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या वेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, सहयोगी अधिष्ठाता डॉ. मंगल पाटील, अहिल्यानगर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमेश्वर राऊत, प्रा. डॉ. हरीभाऊ शिरसाठ व प्रा. डॉ. सूरज खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
हे संशोधन केंद्र ऊस उत्पादक शेतकरी, कृषी विद्यार्थ्यांसह साखर उद्योगाशी संबंधित संशोधक व तज्ज्ञांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…