A truck carrying glass crashed killing 3 workers on the spot
पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वडवली गावाजवळ काच वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक स्टेरिंग लॉक झाल्याने कंटेनराला मागून धडक जोरात धडक बसली. यामध्ये 3 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जखमींना तलासरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रात्री 3: 30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. अपघात घडताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी अपघात स्थळी धाव घेत 3 जणांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…