lightning strike
यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील दत्तापूर येथे 5 मुलं अंगावार वीज पडून गंभीर जखमी झाली. अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे भिजण्यापासून वाचण्यासाठी ही मुलं झाडाखाली थांबली होती. परंतु, दुर्दैवाने ते ज्या झाडाखाली थांबले होते, तिथेच वीज पडल्यामुळे ही मुलं गंभीर जखमी झाली. या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस तालुक्यात दत्तापूर येथे ही मुलं बकऱ्या घेऊन शेतात गेले होते. यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. भिजण्यापासून वाचण्यासाठी ही पाचही मुलं एका झाडाखाली उभी राहिली. मात्र, यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत पाचही मुलं गंभीर जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच, जखमी मुलांच्या कुटुंबियांनी मुलांकडे जाऊन तात्काळ मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…