लाइफ स्टाइल

काजू खाल्ल्याने शरीराला होतात अनेक फायदे, काजू खाताना घ्या ‘ही’ काळजी…

काजूमध्ये प्रथिने, फायबर आणि निरोगी मेद तर असतातच, परंतु त्याचबरोबर विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. ते आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. रक्तातील साखरेचे योग्यप्रकारे नियंत्रण तसेच हृदय निरोगी बनवण्यासाठी काजू फायदेशीर आहेत. काजू हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय ड्रायफ्रूट आहे.

अमेरिकेत 100 दशलक्षाहून अधिक प्रौढ उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रस्त आहेत. 2019 मध्ये करंट डेव्हलपमेंट इन न्यूट्रिशनच्या अभ्यासानुसार, काजू खाल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. काजूचे सेवन केल्याने ट्रायग्लिसराइड्सची पातळीही कमी होते. हा रक्तातील चरबीचा एक प्रकार आहे जो स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि हृदयरोगाचा धोका वाढवू शकतो. मात्र, बाजारात मिळणारे पॅक केलेले किंवा खारट काजू रक्तदाब वाढवू देखील शकतात, त्यामुळे काजू खाताना काळजी घ्यायला हवी.

कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. एलडीएल, ज्यामुळे धमन्यांमध्ये हानिकारक फॅटी बिल्डअप होते आणि एचडीएल, जे एलडीएल कोलेस्ट्रॉल धमन्यांतून दूर करून तुमच्या हृदयाचे रक्षण करते. 2017 मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसले आहे की आपण आहारात काजूचे सेवन केल्याने वाईट एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. एवढेच नाही तर 2018 मध्ये जर्नल ऑफ न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसले आहे की काजूयुक्त आहारामुळे चांगल्या एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.

अमेरिकेत हृदयरोग, स्ट्रोक, श्वसन रोग, मधुमेह आणि अल्झायमर मृत्यूचे प्रमुख कारण आहे. 2007 मध्ये ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की ज्यांनी आठवड्यातून चार वेळा काजू खाल्ले त्यांना हृदयरोगाचा धोका 37% कमी झाला होता. शिवाय, 2018 मध्ये जर्नल ऑफ न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळून आले की जेव्हा टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांनी 12 आठवडे 30 ग्रॅम कच्चे, अनसाल्टेड काजू खाल्ले तेव्हा त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या कमी झाल्या. एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने त्यांच रक्तदाब कमी झाल्याचे दिसून आले. काजू मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स चा एक चांगला स्त्रोत आहे, जे एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

काजू खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात तांबे मिळू शकते. संपूर्ण शरीरातील विविध कार्यांमध्ये तांबे (copper) महत्वाची भूमिका बजावते. यामध्ये हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रण, लाल रक्तपेशींचे उत्पादन, हाडांचा विकास, रक्तवाहिन्या आणि संयोजी ऊतकांचा विकास आणि रोगप्रतिकारक शक्तीचे सक्रियकरण यांचा समावेश आहे.

काजू आणि बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. अँटिऑक्सिडंट्स अशी संयुगे आहेत जी तुमच्या शरीरात नुकसान करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सला अप्रभावी करू शकतात. अशा प्रकारे अँटिऑक्सिडंट्स शरीराला रोगापासून वाचवू शकतात आणि सूज कमी करू शकतात. काजूमध्ये दोन प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यांना पॉलीफेनॉल आणि कॅरोटीनोइड्स म्हणतात. तथापि, कच्च्यापेक्षा भाजलेल्या काजूमध्ये जास्त अँटिऑक्सिडंट असतात.

गैरसमज : काही लोकांना वाटते की काजू खाल्याने शरीराचे वजन वाढू शकते, पण तसे नाही. अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक नियमितपणे काजू खातात त्यांचे वजन काजू न खाणाऱ्यांपेक्षा संतुलित राहण्याची शक्यता असते. कारण काजूमध्ये प्रथिने, फायबर आणि चरबी आहे, ज्यामुळे आपल्याला दीर्घकाळ भूक लागल्यासारखे वाटत नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago