तब्येत पाणी

पावसाळ्यात वाढतो डेंग्यूचा धोका, लवकर बरे होण्यासाठी घ्या ‘हा’ विशेष आहार…

पुणे : डेंग्यू हा आजार एका विशिष्ट डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. देशात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. डेंग्यू विषाणू डासांमुळे पसरतो जे दूषित पाण्यामध्ये वाढतात. हा आजार होण्यापासून बचाव करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपला परिसर स्वच्छ ठेवणे आणि खराब पाणी जमा होण्यापासून प्रतिबंध करणे. प्रतिबंध करणे हे उपचारापेक्षा नेहमी चांगले असते, परंतु कधीकधी प्रतिबंध करणे कठीण होते. डोकेदुखी, उलट्या, अंगदुखी आणि उच्च ताप या लक्षणांनी हा आजार सुरू होतो. काही रुग्णांना डेंग्यूमुळे हिरड्यांमधून रक्तस्त्राव, पोटदुखी आणि रक्ताच्या उलट्या इत्यादीसारख्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात.

आपल्याला लक्षणे दिसल्यास त्यावरील उपचारांची पहिली पायरी म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणे. उपचारांसाठी रुग्णालयात जाणे आवश्यक आहे. उपचार आणि औषधोपचार व्यतिरिक्त, प्रतिबंध करण्यासाठी अधिक चांगला आहार देण्याची शिफारस केली जाते. या आजारातून लवकर बरे होण्यासाठी आपल्याला एक विशेष आहाराची आवश्यकता आहे.

डेंग्यूतून लवकर बरे होण्यासाठी विशेष आहार :

  1. नारळ पाणी : डेंग्यू झाल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता जाणवते, त्यामुळे शरीराला हायड्रेट करणं खूप महत्वाचं असतं. या काळात आपण जास्त पाणी प्यायल्यास शरीर आजारातून लवकर सावरतं. नारळ पाण्यात अधिक पोषक तत्व आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात. जे शरीरातील द्रव पदार्थांचे नियमन करताना विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. हे शरीरास जलद रिकव्हर करण्यात मदत करते.
  2. संत्री : संत्री हे एक असे फळ आहे जे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांनी परिपूर्ण असते. यात पौष्टिक घटक आहेत जे रुग्णाला जलद बरे करण्यात मदत करतात. संत्र्यामध्ये फायबर तसेच व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. हे दोन्ही घटक डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी आणि शरीर वेगाने बरे होण्यास मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण अँटिऑक्सिडेंट आहेत.
  3. डाळिंब : डाळिंब हे फळ लोहाचा उत्तम स्रोत आहे, जे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या टिकवून ठेवण्यास मदत करते. डेंग्यू विषाणूमुळे रक्तातील प्लेटलेट्स कमी पडतात. जर त्या टिकवून ठेवल्या तर शरीरात वेगाने सुधारणा होते. या आजारादरम्यान कमालीचा थकवा येतो. डाळिंब थकवा कमी करण्यास देखील मदत करते.
  4. पपईची पाने / बिया : डेंग्यूच्या रूग्णांना पपईची पाने व बिया खाण्याचा सल्ला दिला जातो. पपईची पाने व बियांमधून काढलेला रस यांमुळे डेंग्यूच्या रूग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की पपईचे दाणे एडीस डासांसाठी विषारी असतात. एडीस हा विषाणू पसरविणाऱ्या डासांपैकी एक आहे, जो डेंग्यूची सुरुवात करतो, हे लक्षात घ्या.
  5. पालक : पालक जीवनसत्त्वे, लोह आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडसने समृध्द अशी भाजी आहे. पालकात असलेले हे पौष्टिक घटक रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात. शरीराची उत्कृष्ट रोगप्रतिकारशक्ती संक्रमणातुन लवकर बरे होण्यास मदत करते.
  6. मेथी : मेथी चांगली झोप लागण्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. तसेच ती सौम्य ट्रॅन्क्विलाइझर म्हणून कार्य करते जे वेदना कमी करण्यास उपयुक्त आहे. मेथी उच्च ताप कमी करण्यास देखील प्रभावी ठरते , जे डेंग्यू दरम्यान एक मुख्य लक्षण मानले जाते.
  7. हळद : हळदीचे आरोग्यासाठी असलेले फायदे सर्वमान्य आहेत. एंटीसेप्टिक आणि मेटाबोलिझम बूस्टर असल्याने बरेच डॉक्टर दुधासह हळदीचे सेवन करण्याची शिफारस करतात.

हे पदार्थ खाणे टाळा :

  1. डेंग्यूने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी तेलकट अन्नापासून दूर राहावे. त्यात जास्त प्रमाणात फॅट्स असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढणे यासारखे दुष्परिणाम होतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते. डेंग्यू दरम्यान, जास्त मसालेदार अन्न न खाण्याचा सल्ला दिला जातो.
  2. या काळात कॅफीनयुक्त पेयांपासून दूर रहावे. या दरम्यान, अधिक हायड्रेट करणारी आणि आरामदायक पेय घेण्याची शिफारस केली जाते. आजारपणात या पेयांमुळे हृदयाचे ठोके वाढणे, थकवा आणि स्नायू बिघाड यासारख्या समस्या निर्माण होतात. तसेच रिकव्हरी होण्यास बाधा येते.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago