Veteran television producer, actor Manju Singh passes away
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मंजू सिंग यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गीतकार, गायक आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी शुक्रवारी ट्विटरवर सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्यासोबत दूरदर्शनसाठी काम केलेल्या वेळेची आठवण करून दिली. स्वानंदला यांनी लिहिले कि, “मंजू जी मला दूरदर्शनसाठी स्वराज शो लिहिण्यासाठी दिल्लीहून मुंबईत घेऊन आल्या होत्या.”
मंजू सिंग हे भारतीय टेलिव्हिजन उद्योगातील एक अग्रगण्य नाव होते. त्यांनी स्वराज, एक कहानी, शो टाइम यासारख्या उल्लेखनीय कार्यक्रमांची निर्मिती केली. त्यांना प्रेमाने सर्वजण ‘दीदी’ म्हणायचे. त्या सात वर्षे चाललेल्या ‘खेल खिलोने’ या मुलांच्या शोची अँकर होती. मंजू सिंग हृषिकेश मुखर्जी यांच्या गोलमालमध्ये देखील दिसल्या होता, त्यांनी रत्नाची भूमिका केली होती.
मंजू सिंग यांनी त्यांच्या शोमध्ये राष्ट्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर प्रकाश टाकला. त्यांनी 1983 मध्ये शो टाईममधून टेलिव्हिजन निर्माता म्हणून सुरुवात केली. त्यांचा एक कहानी हा कार्यक्रम अनेक प्रादेशिक भाषांमधील साहित्यिक लघुकथांवर आधारित होता. आणखी एक शो जो देशभरातील प्रेक्षकांना खूप आवडला होता तो म्हणजे त्यांची डॉक्यु-ड्रामा मालिका अधिकार, जी महिलांच्या कायदेशीर हक्कांवर आधारित होती. त्यांनी सम्यकत्व: ट्रू इनसाइट नावाचा अध्यात्मावरील शो देखील सादर केला होता.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…