Veteran actress Saira Bano admitted to the hospital due to health problems
मुंबई : अभिनेत्री सायरा बानो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ब्लड प्रेशर, हाय शुगर लेव्हल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वीच सायरा बानो यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्या गेल्या 3 दिवसांपासून आयसीयूमध्ये दाखल आहेत. दिलीप कुमार यांच्या मृत्यूच्या दुःखातून त्या अजूनही सावरू शकलेल्या नाहीत. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन होऊन जवळजवळ दोन महिने झाले आहेत, परंतु सायरा बानो त्यांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरू शकलेल्या नाहीत. त्यांचा बीपी सामान्य होत नसून ऑक्सिजनची पातळी कमी राहत असल्यामुळे त्यांना श्वास घेण्यात अडचण येत आहे. परंतु, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. कदाचित, त्यांना आणखी तीन-चार दिवस रुग्णालयात राहावे लागेल.
दोन महिन्यांपूर्वी 7 जुलै रोजी दिलीप कुमार यांचे निधन झाले. दिलीप कुमार यांच्यासोबत 54 वर्षांपासून राहणाऱ्या सायरा बानो दिलीप कुमार यांचा मृत्यू झाल्यापासून कुणाशी बोलत नाहीत किंवा कोणालाही भेटत नाहीत. संपूर्ण जग विसरून त्यांनी दिलीप साहेबांच्या आठवणींना आपले संपूर्ण जग बनवले आहे. सायरा बानो 54 वर्षे दिलीप कुमार यांच्या सहवासात आणि त्यांच्या देखरेखीमध्ये व्यस्त होत्या. त्यांना या धक्क्यातून बाहेर पडणे आणि जगणे अवघड वाटत आहे. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तीन दिवसांपूर्वी जेवण केल्यानंतर त्याची तब्येत बिघडली, म्हणून सायरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सायरा स्वत: देखील 76 वर्षांच्या आहेत, दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न झाले, तेव्हा सायरा 22 वर्षांच्या होत्या. यानंतर त्यांनी आयुष्यभर दिलीप कुमार यांची अतिशय मनापासून सेवा केली, आणि एक आदर्श ठेवला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…