salman khan file defamation case against kamaal rashid khan
मुंबई : चित्रपट अभिनेता कमाल राशिद खानला (केआरके) सलमान बरोबर पंगा घेणं महागात पडलं आहे. आपल्या विचित्र वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारा कमाल खान याच्यावर सलमान खान प्रचंड संतापला असून त्याने केआरके विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. सलमानचा ईदच्या मुहूर्तावर अलीकडेच रिलीज झालेला ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाची समीक्षा करताना केआरकेने सलमानची खूप खिल्ली उडवली होती.
केआरके अनेकदा बॉलिवूड चित्रपट आणि गाण्यांची समीक्षा (Review) करून स्टार्सची खिल्ली उडवत असतो, पण आता केआरके सलमान बरोबर पंगा घेऊन चांगलाच अडचणीत सापडला आहे. सलमानने त्याच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
पहिल्यांदा तर केआरके सलमान बरोबर भांडण्याच्या अविर्भावात दिसला. त्याने ट्विट करत म्हटले कि, “प्रिय सलमान खान, हे मानहानी प्रकरण तुमच्या हताश आणि निराश असण्याचा पुरावा आहे. मी माझ्या फॉलोअर्ससाठी समीक्षा करतो आणि मी माझे कार्य करीत आहे. मला समीक्षा करण्यापासून रोखण्याऐवजी आपण एक चांगला चित्रपट बनवायला हवा. मी सत्यासाठी लढत राहणार आहे. या केससाठी धन्यवाद.”
पण नंतर त्याला समजले की सलमानचा सामना करण्यात आपले नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्याने नंतर सूर बदलला. त्याने सलमानचे वडील सलीम खान यांना विनंती केली की त्यांनी सलमानची समजूत काढावी आणि त्याला ही केस मागे घ्यायला सांगावी. तो यापुढे सलमानच्या चित्रपटांची समीक्षा करणार नाही आणि त्यांचे सर्व व्हिडिओ काढून टाकेल.
केआरकेने ट्विटमध्ये लिहिले कि, “सलीम खान सर मी सलमानच्या चित्रपटाला आणि त्याच्या कारकिर्दीला नुकसान पोहोचवत नाही. मी फक्त मनोरंजनासाठी समीक्षा करतो. पण त्यामुळे सलमानवर परिणाम झाला आहे हे मला माहित असतं, तर मी समीक्षा केली नसती. जर त्याने मला चित्रपटाची समीक्षा न करण्यास सांगितले असते तर मी समीक्षा केली नसती. कृपया त्यांना सांगा की हा खटला पुढे नेऊ नका. मी यापुढे सलमानच्या चित्रपटांची समीक्षा करणार नाही आणि तुम्ही म्हणत असाल तर त्यांचे सर्व व्हिडिओ काढून टाकेल.”
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…