Rajkumar Santoshi sentenced to one year in check bounce case
मुंबई : चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना ५० लाख रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. जर त्यांनी 2 महिन्यांत रक्कम भरली नाही तर त्यांना आणखी एक वर्ष तुरुंगात राहावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
राजकुमार संतोषी आणि अनिल जेठानी यांचे चांगले संबंध होते. यामुळे व्यवसाय मोठा करण्यासाठी त्यांनी अनिल जेठानी यांच्याकडून पैसे घेतले. त्याबदल्यात 22 लाख रुपयांचे तीन स्वतंत्र चेक देण्यात आले. मात्र, तिन्ही चेक बाऊन्स झाल्याने अनिल जेठानी यांनी पैशांसाठी गुन्हा दाखल केला. यानंतर अनिल जेठानी यांनी राजकुमार संतोषी यांना कायदेशीर नोटीस पाठवली.
नोटिशीला उत्तर न मिळाल्याने राजकुमार संतोषी यांच्यावर कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आता राजकुमार संतोषी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, मी सेलिब्रेटी असल्यामुळे माझ्याबरोबर हे सर्वकाही होत आहे. आम्ही सोपे लक्ष्य आहोत. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही या प्रकरणी अपील करू. मला आशा आहे की न्याय मिळेल. या प्रकरणांची सुनावणी राजकोटच्या अतिरिक्त मुख्य न्यायमूर्तींसमोर झाली. फिर्यादींनी पैसे परत करताना कोऱ्या धनादेशात गैरव्यवहार केला असून, व्यवहारात कोणतीही शिल्लक नसल्याचा दावा राजकुमार संतोषी यांनी केला आहे. त्यानंतर न्यायालयाने बँक अधिकाऱ्यांना साक्षीसाठी बोलावले आणि त्यांनी तक्रारदाराची बाजू घेतली.
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी राजकुमार संतोषी यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली. यासोबतच त्यांना ६० दिवसांत पैसे परत करण्याचे आदेशही दिले आहेत. तसे न केल्यास आणखी एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल. राजकुमार संतोषी यांनी अनेक मोठे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…