NCB demands cancellation of bail of Bharti Singh and Harsh Limbachia
कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या ते दोघेही जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. परंतु ड्रग्ज प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी एनसीबीने न्यायालयात केली आहे.
भारती आणि हर्षच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा जप्त केल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी त्या दोघांनाही अटक करण्यात आली होती. यानंतर प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दंडाधिकारी न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला होता. भारती आणि हर्षचा जामीन रद्द करण्यात यावा तसेच त्यांना चौकशीसाठी एनसीबीच्या ताब्यात सोपवण्यात यावे, अशी मागणी देखील केली आहे. न्यायालयाने मंगळवारी भारती आणि हर्षला या संदर्भात नोटीस पाठवली असून, या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…