मनोरंजन

‘त्या’ दोघांना आम्ही दत्तक घेतलेले नाही, माही विजने केला खुलासा

मुंबई : जय भानुशाली आणि माही विज लोकप्रिय कपल आहेत. काही काळापासून माही छोट्या पडद्यावर दिसली नसली तरी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. जय भानुशाली आणि माही विज तीन मुलांचे पालक आहेत. जय आणि माहीने २०१७ मध्ये राजवीर आणि खुशी या दोन भावंडांचे पालकत्व स्वीकारले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांची स्वतःची मुलगी ताराचा जन्म झाला. मात्र, मुलीच्या जन्मानंतर त्यांनी राजवीर आणि खुशी या दोन्ही मुलांना सोडून दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू असते. अखेर, या सर्व प्रश्नांची उत्तरे माहीने एका मुलाखतीमध्ये दिली आहेत.

माहीने स्पष्ट केले कि, ‘या दोघांना आम्ही दत्तक घेतलेले नाही. तर आम्ही या दोघांचे पालक आहोत. त्यांचे वडील आमच्याबरोबर काम करतात. राजवीर आणि खुशी यांचा जन्म झाल्यापासून ते आमच्यासोबतच आहेत. त्यामुळे ते मला आई आणि जयला बाबा म्हणतात. आम्ही सर्वजण एका आनंदी कुटुंबाप्रमाणे एकत्र राहतो आहोत. परंतु आम्ही या दोघांना दत्तक घेतले आहे, ही गोष्ट कुठून आली हे मलाही कळलेले नाही.’ माही पुढे म्हणाली कि, ‘राजवीर आणि खुशी सध्या त्यांच्या आई- वडिलांसोबत गावी गेले आहेत. कोरोना काळामध्ये गावाला राहणे जास्त सुरक्षित असल्याचे त्यांच्या वडिलांच्या आईचे मत होते. त्यानुसार ते सर्वजण गावाला गेले. ते इथून गेल्यामुळे आमच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर आम्ही या दोघांना सोडून दिल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत असाव्यात.’

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

‘बार्टी’ कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…

7 तास ago

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

7 तास ago

भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…

7 तास ago

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ : वेग, सुरक्षितता आणि आधुनिक अभियांत्रिकीचा संगम

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…

7 तास ago

राज्यात सात जिल्ह्यांत एमआरआय सेवेचे लोकार्पण ; ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवेचा विस्तार

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…

7 तास ago

फार्मर आयडी :२० मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन, अन्यथा योजनांचा लाभ बंद

मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…

7 तास ago