मनोरंजन

‘त्या’ दोघांना आम्ही दत्तक घेतलेले नाही, माही विजने केला खुलासा

मुंबई : जय भानुशाली आणि माही विज लोकप्रिय कपल आहेत. काही काळापासून माही छोट्या पडद्यावर दिसली नसली तरी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. जय भानुशाली आणि माही विज तीन मुलांचे पालक आहेत. जय आणि माहीने २०१७ मध्ये राजवीर आणि खुशी या दोन भावंडांचे पालकत्व स्वीकारले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांची स्वतःची मुलगी ताराचा जन्म झाला. मात्र, मुलीच्या जन्मानंतर त्यांनी राजवीर आणि खुशी या दोन्ही मुलांना सोडून दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू असते. अखेर, या सर्व प्रश्नांची उत्तरे माहीने एका मुलाखतीमध्ये दिली आहेत.

माहीने स्पष्ट केले कि, ‘या दोघांना आम्ही दत्तक घेतलेले नाही. तर आम्ही या दोघांचे पालक आहोत. त्यांचे वडील आमच्याबरोबर काम करतात. राजवीर आणि खुशी यांचा जन्म झाल्यापासून ते आमच्यासोबतच आहेत. त्यामुळे ते मला आई आणि जयला बाबा म्हणतात. आम्ही सर्वजण एका आनंदी कुटुंबाप्रमाणे एकत्र राहतो आहोत. परंतु आम्ही या दोघांना दत्तक घेतले आहे, ही गोष्ट कुठून आली हे मलाही कळलेले नाही.’ माही पुढे म्हणाली कि, ‘राजवीर आणि खुशी सध्या त्यांच्या आई- वडिलांसोबत गावी गेले आहेत. कोरोना काळामध्ये गावाला राहणे जास्त सुरक्षित असल्याचे त्यांच्या वडिलांच्या आईचे मत होते. त्यानुसार ते सर्वजण गावाला गेले. ते इथून गेल्यामुळे आमच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर आम्ही या दोघांना सोडून दिल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत असाव्यात.’

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago