Aamir Khan made a big decision not to use mobile
बॉलिवूड अभिनेता आमिर खानने आपल्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या पूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आमिर खानने मोबाईलचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमिरने आपल्या पुढील चित्रपटासाठी ही वेगळीच पद्धत अवलंबली आहे. फोन सतत त्याच्या कामात अडथळे निर्माण करत आहे, असं आमीरचं म्हणणं आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामध्ये त्याचा फोन अडथळा ठरू नये, म्हणून अभिनेत्याने हे पाऊल उचलले आहे.
आमिर खानचा हा चित्रपट देखील ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होईल. ‘लालसिंग चड्ढा’ मध्ये आमिर आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात मोना सिंग देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. मोनाने 3 इडियट्समध्ये आमिर-करीनाबरोबरही काम केले आहे. या चित्रपटामध्ये हे तिघे पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळतील.
आमिर खानचे ख्रिसमस रिलीज चित्रपट कायमच हिट ठरले आहेत. पीके, दंगल, धूम 3, तारे जमीन पर आणि गजनी. आमिर या सर्व चित्रपटांमध्ये त्याच्या 100% योगदानासाठी ओळखला जातो. आता आमिर खान ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. अशा परिस्थितीत आवश्यक गोष्टींना महत्त्व देत आणि मोबाईल पासून दूर राहून आमिरने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून का मानले जाते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…