entire family committed suicide, A suicide note has been found
मुंबई : एका पुरुष कॉन्स्टेबलची हत्या केल्याप्रकरणी एक महिला कॉन्स्टेबल आणि तिच्या दोन साथीदारांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येला अपघाताचे रूप देण्यात आले होते. मात्र, तब्बल एक महिन्यानंतर ही सुपारी देऊन केलेली हत्या असल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय शिवाजी माधव सानप हे दररोज पनवेल स्टेशनवरून जात असत. पनवेलहून ट्रेनने ते कुर्ला स्थानकावर जाऊन तिथे उतरून मग नेहरू नगर पोलीस स्टेशनला जायचे, तिथे त्यांची पोस्टिंग होती. 15 ऑगस्ट रोजीही शिवाजी सानप रोजच्याप्रमाणे पनवेल स्टेशनच्या दिशेने जात होते, तेव्हा वाटेत त्यांना एका नॅनो कारने धडक दिली. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही केस सुरुवातीला हिट अँड रन केस असल्याचे दिसत होते, पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा पोलिसांना काहीतरी संशयास्पद वाटले. तसेच पोलिसांना घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरावर तीच नॅनो कार जळालेल्या अवस्थेत सापडली. कार जळालेली असल्याने कोणताही पुरावा शिल्लक नव्हता.
पोलिसांनी तपास सुरू केला असता शिवाजी सानप आणि महिला कॉन्स्टेबल शीतल पानसरे यांच्यात जुने वैर असल्याचे दिसून आले. या संपूर्ण प्रकरणाची मास्टरमाईंड शीतल होती, तिने शिवाजी यांना मारण्यासाठी विशाल जाधव आणि बबन चव्हाण यांना सुपारी दिली होती. सुरुवातीला, तिघांनी मिळून शिवाजी सानप यांच्या दिनचर्येवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आणि नंतर त्यांना मारण्याचा कट रचला. जाधव आणि चव्हाण यांनीच शिवाजी यांना नॅनो कारने धडक दिली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
महिला कॉन्स्टेबल शीतल पानसरे, विशाल जाधव आणि बबन चव्हाण यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, शीतलने शिवाजीविरुद्ध विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पानसरे यांना वैयक्तिक शत्रुत्वामुळे शिवाजी यांना ठार मारायचे होते, त्यामुळे आरोपी महिला पोलिसाने अपघात घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी गणेशला विकाराबाद तेलंगणा आणि विशालला बुलढाण्यातील पडसी बुद्रुक येथून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…