व्हॅलेंटाईन डे : फेब्रुवारी महिना सुरु झाला की चाहूल लागते ती अशा दिवसाची ज्याची प्रेमी युगुलं आतुरतेनं वाट पाहत असतात. प्रेमी युगुलं त्यांचं प्रेम १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ला साजरं करतात. प्रेमाच्या त्यांच्या प्रवासात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्वं असतं असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. किंबहुना हा एक दिवस नव्हे तर संपूर्ण आठवडाच प्रेमी युगुलांसाठी खास असतो. कारण तो व्हॅलेंटाईन वीक असतो. दरवर्षीप्रमाणंच यंदाही हा आठवडा 7 फेब्रुवारीला रोझ डे पासून सुरु होऊन १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे पर्यंत साजरा होईल.
‘व्हॅलेंटाईन डे’ या दिवशी आठवतं आपलं पहिलं प्रेम. पहिलं प्रेम प्रत्येकाच्या वाट्याला येतंच असं नाही. ती एक वाऱ्याची झुळूक असते जी प्रत्येकाला अनुभव देत नाही. कधी कधी प्रेम जपून ठेवावं असं असतं, तर कधी जखमा देऊन जातं. आपल्या सोबत कोणीतरी हक्काचं माणूस असावं, जे आपल्या सुख-दुःखात कायम सोबत राहील, अशा व्यक्तीच्या शोधात प्रत्येकजण असतो. काही थोडावेळ सोबत करतात, तर काही आयुष्याचे साथीदार होऊन प्रेम फुलवतात.
व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात कशी झाली? :
आठशे वर्षांपूर्वी रोम राज्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली. प्रेम व्यक्त करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असे मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्यांचाही त्याला राग येत असे. संत व्हॅलेंटाईनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने वेलेंटाईनला तुरुंगात कैद केले.
तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाईनचे जेलरच्या आंधळ्या मुलीवर प्रेम बसले. त्याच्या प्रेमाच्या शक्तीने त्या मुलीचे अंधत्व नाहीसे झाले, असे सांगितले जाते. इसवी सन 269 च्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनने प्रेम केले म्हणुन शिक्षा देण्यात आली. व्हॅलेंटाईनला या दिवशी फाशी देण्यात आली. व्हॅलेंटाईनने प्रेयसीला एक पत्र लिहिले होते. या पत्रात ‘यूवर व्हॅलेंटाईन, तुझा चाहता’ असे लिहिले होते. तेव्हापासून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनच्या स्मरणानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.
व्हॅलेंटाईन वीक :
चला तर मग, करा तयारी.. व्यक्त होण्याची. आपल्या भावना व्यक्त करा, अशा व्यक्तीकडे ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो. आपण समोरच्या व्यक्तीवर किती प्रेम करतो, ही जाणीव एकमेकांना करून दिली कि नात्यात गोडवा येतो. प्रेम करायलाच हवं. मग ते प्रेयसी, बायको, आईवडील, भाऊ, बहीण, मित्र कोणावरही करता येतं. इतकं साधं अन सरळ असतं प्रेम!
हा लेख तुम्हाला आवडला असेल आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
ठाणे : ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनाच…
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित 'मतासाठी निधी' या…
मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले…
मुंबई, दि. 24 : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि…
मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून…
मुंबई, दि. २४ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…