Government Announcement Hike Msp For Kharif Crops 2021-22
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून खरीप हंगामापूर्वीच पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) च्या दरात वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात खरीप पिकासाठी MSP ची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकारने सर्वाधिक दरवाढ ही तीळसाठी केली आहे. तीळाचा खरेदी दर हा ४५२ रुपये प्रति क्वींटलने वाढवला आहे. यानंतर तूर आणि उडीद या दोन्ही डाळींच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) क्विंटल मागे ३०० रुपयांनी वाढ केली आहे. सामान्य प्रतिच्या धानाचा भाव हा १८६८ रुपये प्रति क्वींटल होता. तो आता २०२१-२२ साठी वाढवून १९४० रुपये प्रति क्वींटल करण्यात आला आहे. बाजरीचा भाव २०२०-२१ मध्ये २१५० रुपये प्रति क्विंटल होता तो आता २२५० रुपये प्रति क्वींटल करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.
कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्वीट केलं आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध आहे. खरीप विपणन हंगाम २०२१-२२ साठी सर्व खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतींना आर्थिक व्यवहाराच्या मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…